Breaking
कृषीवार्ता

जुन्नर तालुक्यामध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जुन्नर तालुक्यात बिबट_आणि_मानव_संघर्ष दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. बिबट्यांचे माणसांवर होणारे हल्ले आणि त्याचं वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. तालुक्यामध्ये सर्वत्र बिबट्या दिसणे फारच कॉमन झाले आहे. काही दिवसांपूर्वी उंब्रज, #बोरी, आळे आदी ठिकाणी बिबट हल्ल्याच्या घटना घडल्या आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचे हल्ले आणि वास्तव्य वाढत चालले आहे. शेती, वाडी, वस्तीच्या भागात राहणारे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकरी आपल्या लहान मुलांनाही शाळेत पाठवण्यास धजावत आहेत. चार वर्षांपासून पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील संजय मोहन कोळेकर हे शिरोली_खुर्द परिसरात उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात. येथील संपत केरू मोरे यांच्या शेतावर ह्या धनगराचा_वाडा होता. त्याठिकाणी पहाटे च्या दरम्यान बिबट्याने संस्कृती_संजय_कोळेकर ह्या दीड वर्षाच्या मुलीला ऊसाच्या शेतात नेले आणि ठार केले. सदर घटनेची माहिती समजताच वनविभाग व पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी वनविभागाला लवकरात लवकर हा नरभक्षक बिबट्या जेरबंद होण्यासाठी ड्रोन, पेट्रोलिंग, पिंजरे तात्काळ लावून. स्थळ पंचनामा करून ह्या कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर कशी मिळेल व तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट उपलब्ध करून दिली गेली पाहिजे तसेच बिबट्यांना पकडुन त्यांची नसबंदी करण्यासंबंधित शासन दरबारी प्रस्ताव कुठपर्यंत आहे त्याची माहिती झाली पाहिजे. ह्या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर भविष्यात शेतकरी बांधवांसोबत शासन व वनविभागाविरोधात मोठा संघर्ष उभा राहू शकतो. सदरच्या प्रश्नाकडे DYSP चौधरी साहेब, चव्हाण साहेब, RFO काकडे साहेब, वन व पोलिस विभागातील कर्मचारी, रेस्क्यू टीम, यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सरकार दरबारी हा प्रश्न उपस्थित करून जनतेला भयमुक्त करावे.

0 0 3 8 1 4
जुन्नर तालुक्यामध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 8 1 4

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे